

Chandrapur News
esakal
जिवती (जि. चंद्रपूर): जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्याची ओळख आदिवासी आणि दुर्गम भाग अशी आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.