

Amravati Rain
esakal
अमरावती: जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांत झालेल्या धुव्वांधार पावसाने अमरावती विभागातील दहा जणांचा बळी घेतला असून पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त केली आहेत. सर्वाधिक नुकसान बुलडाणा जिल्ह्यात झाले आहेत. विभागातील १०५ कुटुंबांना विस्थापित होण्याची वेळ आली. ३६ तालुक्यांतील १३४३ गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे. ‘एल निनो’च्या प्रभावाने मॉन्सून कमजोर पडला असून विखूरलेल्या स्वरूपात पाऊस येत आहे.