तीन वर्षांपासून बाजार समितीचा कारभार ठप्प 

हिंगणा बाजार समिती
हिंगणा बाजार समिती

हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता पसरली आहे. 
हिंगणा तालुक्‍यात यावर्षीच्या खरीप हंगामात पाऊस वेळेवर पडला नाही. यामुळे कापूस, सोयाबीन, तुरीचे पीक अद्यापही शेतात डोलत आहे. पाऊस लांबल्याने अद्यापही पीक निघाले नाही. बाजार समिती प्रशासनाला कापूस व तूरखरेदी केंद्राला परवानगी द्यावी, अशी मागणी नाफेडकडे केली होती. मात्र, परवानगी अद्यापही मिळाली नाही. कापूस खरेदी करणारी कोणतीही जिनिंग हिंगणा परिसरात नाही. व्यवहार ठप्प झाल्यामुळे अडते व व्यापारीही बेपत्ता झाले आहे. शेतकऱ्यांना गिरोला किंवा बुटीबोरी येथील बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी जावे लागते. मागील वर्षी दुष्काळामुळे उन्हाळ्यात संत्रा पिकाची झाडे मोठ्या प्रमाणात वाळली. या वर्षीच्या हंगामात संत्रा पीकसुद्धा बहरले नाही. संत्र्याला चांगला भाग असला तरी पीक हाती नसल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यकर्ते व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला, सरकारकडे वेळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 
हिंगणा तालुक्‍यात शेतकऱ्यांची संख्या जवळपास सहा हजारांच्या घरात आहे. 70 टक्‍के शेतकरी कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेतात. या वर्षी कापसाला शासनाकडून अद्यापही हमीभाव घोषित झालेला नाही. राज्य शासनाच्या पणन विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून नाफेडचे कापूस व तूरखरेदी केंद्र सुरू करण्याला परवानगी देणे गरजेचे आहे. 
- बबनराव आव्हाले, सभापती, कृ.उ.बा.स. हिंगणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com