महिला विकासासाठी कस्तुरबा स्मारक ट्रस्ट

file photo
file photo

सेवाग्राम (जि. वर्धा) : महात्मा गांधींचा 75 वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे देशभरातील कार्यकर्त्यांनी ठरविले आणि लोकवर्गणीतून 75 लाख रुपयांचा निधी गोळा केला. हा निधी सेवाग्राम आश्रमात बापूंच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच निधीतून कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टची स्थापना झाली.
आज महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आणि कस्तुरबा गांधी स्मारक ट्रस्टचे 75 वे वर्ष साजरे होत आहे. राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी पुण्याच्या आगाखान महालात कैद असताना त्यांचे 22 फेब्रुवारी 1944 रोजी निधन झाले. या घटनेने देशभरात दुखवटा होता. यानंतर महात्मा गांधी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सरोजिनी नायडू आणि अमृतलाल ठक्कर यांच्या पुढाकारात जनतेने 80 लाख रुपये गोळा केले. हा निधी सेवाग्राम आश्रमात दोन ऑक्‍टोबर 1944 रोजी गांधीजींच्या सुपूर्द करण्यात आला.
गांधीजींनी या निधीचा वापर विनियोग पद्धतीने करण्याचे ठरविले आणि राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टची स्थापना झाली. या निधीचा विनिमय महिलाच करतील, असे गांधीजींनी सांगितले. हा निधी ग्रामीण महिलांच्या विकासाकरिता खर्च करावा, ते कामही महिलांनीच करावे असे ठरले. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रांतात महिला प्रतिनिधींची नियुक्त करण्यात आली. त्यावेळी देशभरात 550 केंद्र स्थापन करण्यात आले. आता हे काम एकूण 350 केंद्रात सुरू आहे.
दिल्ली, श्रीनगर, कर्नाटकातील आरचिकेरी, केरळमधील कोची, महाराष्ट्रातील सासवड (पुणे), धारणी (मेळघाट) अशा 27 राज्यांत काम सुरू आहे. याचे मुख्य केंद्र इंदोर येथे आहे, असे कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधी शेवंता चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com