

Chandrapur
esakal
चंद्रपूर: भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील शेकडो अर्ज प्रलंबित आहेत. विद्यार्थी आणि महाविद्यालयीनस्तरावर प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित अर्जांसाठी शिष्यवृत्ती अदा केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.