

Education Crisis in Maharashtra 9 Percent Students Leave School After Class 8 as Single Teacher Schools Rise
sakal
-मंगेश गोमासे
नागपूर: राज्यात माध्यमिक स्तरावर (इयत्ता नववी व दहावी) नऊ टक्के विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून शाळाबाह्य होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची बाब केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘युडीआयएसई प्लस - २०२५-२६’च्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा चिंताजनक पैलू समोर आला आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात गळतीचे प्रमाण ८.५ टक्के आहे.