

Yavatmal News
esakal
मोर्शी: शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत असून डस्टबीनच्या अभावामुळे नागरिकांना कचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून शहरातील अनेक भागांत डस्टबीन पूर्णपणे नाहीशा झाल्याने कचऱ्याचे ढीग रस्त्यावर साचत असून अस्वच्छतेची भीषण समस्या निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.