

वर्धा : शेतकऱ्यांनी कृषी योजनांसोबतच स्वतःचे वर्षभर मिळेल असे उत्पन्न स्रोत निर्माण करून त्यांना बळकट करणे महत्त्वाचे आहे, तसेच वन्यप्राण्यांच्या समस्येवर उपाय काढणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून ते आत्मसात करावे व इतर शेतकऱ्यांना उद्योग विकासासाठी प्रेरित करावे, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी शेतकऱ्यांना केले.