

Nagpur News
esakal
नागपूर: समाज सुदृढ हवा असेल तर बालके सुदृढ हवीत. त्यासाठी एखादे मूल या जगात येण्याची चाहूल लागल्यापासून ते बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत एक हजार दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. या दिवसांत बालकांचा पूर्णपणे विकास होतो आणि त्यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. बालकांचे बालपण निरोगी करण्यासाठी युनिसेफ व सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, महाराष्ट्र शासनाचा एकात्मिक बालविकास प्रकल्प व आरोग्य विभाग यांनी ‘आरंभ’चा प्रकल्प हाती घेतला आहे.