न्यायालय म्हणाले, जामीन अर्ज मंजूर केला तर समाजात चुकीचा संदेश जाईल

न्यायालय म्हणाले, जामीन अर्ज मंजूर केला तर समाजात चुकीचा संदेश जाईल

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याअंतर्गत कऱ्हाडला क्षेत्रातील कक्ष क्रमांक १४१५ मध्ये एक वाघीण व तीन बछड्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना एक ते दोन जानेवारीदरम्यान उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपी दिवाकर दत्तूजी नागेकर (रा. नवेगाव साधू) याने सूडबुद्धीने वाघाची शिकार केल्याचे तपासात निदर्शनास आले. आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

न्यायालयाच्या निर्णयात वाघ या वन्यप्राण्यांच्या अस्तित्वास असलेला धोका लक्षात घेता या प्रजातीस संरक्षण देणे अभिप्रेत असल्याचे नमूद केले आहे. प्रकरणी आरोपीच्या कालवडीस वाघाने जीवे मारल्याने आरोपीने चार वाघांना जीवे मारले आहे. हा गंभीर गुन्हा आरोपीकडून करण्यात आल्याचे नमूद करून वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असे नमूद करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. गांभीर्याने दखल घेत उमरेड येथील प्रथम श्रेणी (कनिष्ठ स्तर) न्यायदंडाधिकारी यांच्याद्वारे दहा फेब्रुवारीपर्यंत आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या प्रकरणात शासनाच्या वतीने विशेष सल्लागार ॲड. कार्तिक सुकुल यांनी भक्कमपणे बाजू मांडली. प्रकरणी गुन्ह्याचा तपास वन्यजीव सेलू घटक पेंच व्याघ्रप्रकल्पातील सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणी यांच्याद्वारे करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी राहुल गवई यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com