अमरावती : अमरावती येथील कार्य आयोजना विभागाचे उपवनसंरक्षक व भारतीय वनसेवेतील अधिकारी आशिष पांडे यांच्या विरोधात एल्गार पुकारल्यानंतर वनविभागाचे प्रशासन नरमले. ११ वनकर्मचाऱ्यांच्या सामूहिक बदलीचा निर्णय मागे घेण्यात आला..अमरावती विभागाच्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जयोती बॅनर्जी यांनी सामूहिक बदलीचा आदेश मागे घेण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. महत्त्वाची बाब म्हणजे येथील कार्य आयोजना विभागातील उपवनसंरक्षक आशिष पांडे यांनी ११ कर्मचाऱ्यांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर कार्यालयात वर्ग केले होते. त्यामुळे त्यांची ही वागणूक कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारी असल्याचे सांगून पांडे यांची चौकशी करून बदली करण्यात यावी, अशी मागणी या अकराही कर्मचाऱ्यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्याकडे केली होती. .शिवाय त्याविरोधात सोमवारपासून (ता. दोन) सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या विभागातील हे सर्वच कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्याचे कार्य आयोजना विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर यांनी सांगितले. या मुद्द्यासंदर्भात प्रशासकीय भूमिका समजून घेण्याकरिता कार्य आयोजना विभागाचे उपवनसंरक्षक आशिष पांडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्वत: बोलणे टाळले. मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी मात्र अकरा कर्मचाऱ्यांची बदली रद्द करण्याचे आदेश आल्याचे सांगितले. .त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या विरोधात कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही विशाखा समितीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांसह ज्यांच्या विरोधात आरोप आहेत, त्यांचे मत जाणून घेणे प्रशासनाचे कर्तव्य असते, असे मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी सांगितले..कारवाईचा अधिकार मुख्य सचिवांकडेअमरावती येथील वनविभागाच्या कार्य आयोजना विभागातील उपवनसंरक्षक आशिष पांडे हे एक आयएफएस दर्जाचे अधिकारी आहेत. यांच्यासंदर्भात ज्या अकरा कर्मचाऱ्यांनी आरोप करून कारवाईची मागणी केली त्याची अंतर्गत चौकशी सुरू आहे. या विषयासह इतर मुद्द्यांबाबत राज्य शासनाच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले. त्यामुळे याबाबीचा निर्णय मुख्य सचिव हेच घेऊ शकतात, असे मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी स्पष्ट केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
अमरावती : अमरावती येथील कार्य आयोजना विभागाचे उपवनसंरक्षक व भारतीय वनसेवेतील अधिकारी आशिष पांडे यांच्या विरोधात एल्गार पुकारल्यानंतर वनविभागाचे प्रशासन नरमले. ११ वनकर्मचाऱ्यांच्या सामूहिक बदलीचा निर्णय मागे घेण्यात आला..अमरावती विभागाच्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जयोती बॅनर्जी यांनी सामूहिक बदलीचा आदेश मागे घेण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. महत्त्वाची बाब म्हणजे येथील कार्य आयोजना विभागातील उपवनसंरक्षक आशिष पांडे यांनी ११ कर्मचाऱ्यांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर कार्यालयात वर्ग केले होते. त्यामुळे त्यांची ही वागणूक कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारी असल्याचे सांगून पांडे यांची चौकशी करून बदली करण्यात यावी, अशी मागणी या अकराही कर्मचाऱ्यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्याकडे केली होती. .शिवाय त्याविरोधात सोमवारपासून (ता. दोन) सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या विभागातील हे सर्वच कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्याचे कार्य आयोजना विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर यांनी सांगितले. या मुद्द्यासंदर्भात प्रशासकीय भूमिका समजून घेण्याकरिता कार्य आयोजना विभागाचे उपवनसंरक्षक आशिष पांडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्वत: बोलणे टाळले. मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी मात्र अकरा कर्मचाऱ्यांची बदली रद्द करण्याचे आदेश आल्याचे सांगितले. .त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या विरोधात कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही विशाखा समितीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांसह ज्यांच्या विरोधात आरोप आहेत, त्यांचे मत जाणून घेणे प्रशासनाचे कर्तव्य असते, असे मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी सांगितले..कारवाईचा अधिकार मुख्य सचिवांकडेअमरावती येथील वनविभागाच्या कार्य आयोजना विभागातील उपवनसंरक्षक आशिष पांडे हे एक आयएफएस दर्जाचे अधिकारी आहेत. यांच्यासंदर्भात ज्या अकरा कर्मचाऱ्यांनी आरोप करून कारवाईची मागणी केली त्याची अंतर्गत चौकशी सुरू आहे. या विषयासह इतर मुद्द्यांबाबत राज्य शासनाच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले. त्यामुळे याबाबीचा निर्णय मुख्य सचिव हेच घेऊ शकतात, असे मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी स्पष्ट केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.