

Nagpur News
esakal
नागपूर: काटोल आणि नरखेड तालुक्यातील तब्बल १२२ गावांमध्ये भूजल पातळी खालावल्यामुळे गेल्या दोन दशकांपासून सिंचन विहीर खोदकामावर बंदी होती. मात्र, अटल भूजल योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या व्यापक उपाययोजनांमुळे भूजल पातळीत सरासरी दोन फुटांनी वाढ झाली. यामुळे शासनाने या गावांमध्ये सिंचन विहीर खोदकामास परवानगी दिली आहे.