
नागपूर : ‘‘महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली. सरकार विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने काम सुरू केले असून या भागांच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे ते म्हणाले.