

CM Devendra Fadnavis
sakal
नागपूर : काँग्रेस हा इंदिरा गांधींच्या काळातही कधीच डाव्या विचारांचा पक्ष नव्हता. मात्र, राहुल गांधींनी पक्षाची धुरा सांभाळल्यापासून काँग्रेस अती डाव्या विचारांचा पक्ष झाला आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष असतानाही सरकारच्या धोरणांना विरोध करण्यापेक्षा ते कायम संवैधानिक संस्थांवर हल्ला करीत आहेत.