

Nagpur News
esakal
भिवापूर: तालुक्यातील धामणगाव (विद्यामंदिर) येथे शनिवारी (ता.२) सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ४० पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी अनेक जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत घरातील धान्य, कपडे, कागदपत्रे व जीवनावश्यक वस्तू पूर्णतः नष्ट झाल्याने गावातील अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.