
नागपूर : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी यांचे उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथील मऊ जनपद येथे शनिवारी (ता.२३) सकाळी झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या घटनेमुळे विद्यापीठावर शोककळा पसरली आहे.