नागपूर : गेल्या अडीच, तीन वर्षात निवडणुकाच झाल्या नसल्याने अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राज आहे. परंतु आता हे प्रशासक राज संपणार असल्याचे दिसते. .ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील वर्षी २४ जानेवारी अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर दोन-तीन महिन्यात निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..ग्राम विकास विभागाकडून याबाबतचा आदेश काढण्यात आला. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात मुदत संपणाऱ्या व नवीन अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. .स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच जाहीर केल्या नाही. यामुळे राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीबाबत येथील नागरिकांना मोठी उत्सुकता आहे..विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा होती. ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
नागपूर : गेल्या अडीच, तीन वर्षात निवडणुकाच झाल्या नसल्याने अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राज आहे. परंतु आता हे प्रशासक राज संपणार असल्याचे दिसते. .ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील वर्षी २४ जानेवारी अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर दोन-तीन महिन्यात निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..ग्राम विकास विभागाकडून याबाबतचा आदेश काढण्यात आला. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात मुदत संपणाऱ्या व नवीन अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. .स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच जाहीर केल्या नाही. यामुळे राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीबाबत येथील नागरिकांना मोठी उत्सुकता आहे..विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा होती. ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.