Health in Summer : उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची भीती

सध्या नवतपा सुरू झालाय. अशावेळी त्रासदायक उकाडा अनारोग्यास कारणीभूत ठरतो. या दिवसात अल्पश्रमानेही थकवा येतो.
nosebleeds
nosebleedssakal

नागपूर - सध्या नवतपा सुरू झालाय. अशावेळी त्रासदायक उकाडा अनारोग्यास कारणीभूत ठरतो. या दिवसात अल्पश्रमानेही थकवा येतो. शरीरातून घामावाटे जीवनावश्‍यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकले जाते आणि जीवनघटकांचा नाश होतो.

यामुळे क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागीणसारखे विकार होण्याचा धोका असतो. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघाताचाही धोका असून नाकातून रक्त येण्याची समस्या असते. यामुळे दुपारी १२ ते ५ या वेळा घरातून बाहेर निघू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

उन्हामुळे सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. घामामुळे शरीराला दुर्गंधी व त्वचारोग होण्याची शक्‍यता असते. अंगावर घामोळ्या तसेच फोड येतात. उन्हात जास्तकाळ काम केल्याने उष्णता वाढते. चेहरा तसेच अंगावरची त्वचा काळसर होते.

उष्माघात झाल्यास व्यक्ती मुर्छित होण्याची शक्‍यता असते. काळजी घेतल्याने उन्हाळा सुकर करता येतो. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तर उकाड्यात बाहेर काढूच नका, असे डॉ. अविनाश गावंडे म्हणाले.

नाकातून रक्त आल्यास हे करा

  • थंड पाणी डोक्यावर टाकावे.

  • नाकातून रक्त येत असल्यस तोंडाने श्वास घ्यावा.

  • कांदा कापून त्याचा दर्प घ्यावा.

  • बर्फ कापडात लपेटून नाकाजवळ ठेवावा.

उष्माघाताची लक्षणे

  • ताप येतो.

  • डोके दुखतात.

  • डोळ्यांची आग होते.

  • जीव घाबरणे.

  • मळमळ वाटणे.

शरीरातील पाणी कमी झाल्यास

  • चक्कर येणे

  • भूक कमी लागणे

  • तहान न भागणे

  • उन्हाळी लागणे

घरगुती उपाय

  • थंड पाण्याचा वापर करावा.

  • कांद्याचा रस तळपायाला लावावा.

  • लिंबू-पाणी अधिकाधिक प्यावे.

  • कामाशिवाय उन्हात घराबाहेर पडू नये.

उष्माघात टाळण्यासाठी...

  • डोक्‍याला पांढरा स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे.

  • उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये.

  • ताप असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी.

  • टरबूज, कांदा, डांगर यांचा जास्त वापर करावा.

विविध आजारांसह उन्हाळ्यात नाकातून रक्त येणे ही समस्या अनेकांना भेडसावते. यामुळे अनेक जण घाबरतात. नाकातून येणारे रक्त प्रत्येकवेळी आरोग्यासाठी घातक असतेच असे नाही. त्यामुळे घाबरू नये. उन्हाळ्यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाकातून रक्त येऊ शकते. नाकाच्या अगदी बाहेरच्या भागात एक नस असते. ही नस फुटली किंवा पडल्यामुळे तिच्यावर आघात झाला तर नाकातून रक्त येते. नाकातून होणाऱ्या रक्तस्त्रावासोबतच काही वेळा कान आणि तोंडातूनही रक्त येऊ शकते. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com