

Nagpur
esakal
नागापूर: महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेले कोट्यवधींचे काम रद्द होते की काय? अशी भीती नागापूर ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. केवळ पाच गुंठे जागेअभावी तीन वर्षांपासून येथील कामे रखडली आहेत. त्यामुळे वाण धरण उशाला असूनही आमच्या नशिबी गढूळ पाणी असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.