

Nagpur
esakal
कन्हान: मुंबई-हावडा मुख्य रेल्वेमार्गावरील कन्हान रेल्वे स्थानकाजवळील तुकारामनगर परिसरात भरधाव रेल्वेच्या धडकेत सहा हरणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. चक्क सहा हरणांचा मृत्यू झाल्याने वनविभागासह रेल्वेविभागही हादरला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.