Nagpur News: काटोल वरूड मार्गावरील पुलांचे काम अपूर्ण का? उच्च न्यायालयाची केंद्र राज्याला नोटीस; ‘सकाळ’च्या वृत्ताचा दणका
Katol Varud Bridge Delay: काटोल-वरूड मार्गावरील तीन महत्त्वाचे पुल सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतरही पुलांचे काम रखडल्यामुळे वाहनचालक व शेतकरी संकटात आहेत.
नागपूर : काटोल-वरूड मार्गावरील तीन मुख्य पुलांचे बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. ‘सकाळ’ने यावर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे.