

Nagpur News
esakal
कोदामेंढी (ता. मौदा, जि. नागपूर) : रामटेक, भंडारा तसेच धानला-कोदामेंढी महामार्गाला जोडणारा कोदामेंढी येथील ‘बंगला चौक’ आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. सुसाट धावणारी वाहतूक आणि वाढती वर्दळ यामुळे गेल्या वीस वर्षांत या चौकात शेकडो अपघात झाले असून, २० ते २५ जणांचा बळी गेला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. तरीही चौकाचे रुंदीकरण, सुशोभीकरण आणि सुरक्षाविषयक उपाययोजना रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.