Tiger Crisissakal
नागपूर
Tiger Crisis: धक्कादायक... राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू; विदर्भात सहा महिन्यांत तीस वाघ गमावले, महाराष्ट्र आघाडीवर
Maharashtra Wildlife: विदर्भात जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत तब्बल ३० वाघांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात वाघ मृत्यूदरात आघाडीवर आहे. वाघांची वाढती संख्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील अन्नटंचाईमुळे मानव-वाघ संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
नागपूर : विदर्भात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३० वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सध्या वाघाच्या मृत्युदरात अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश, कर्नाटकाचा समावेश असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडेवारीवरून दिसते.

