

नागपूर : युवा अवस्थेत मोर्चाचे नेतृत्व करीत असताना रेल्वेच्या टीसीसोबत भांडण झाले. रक्त अगदी उसळ्या घेत होते. त्यातून हातही उगारला. ३३ वर्षांपूर्वीची ही घटना त्यावेळी गुन्हा नोंदविला गेला. पण, कारवाई पुढे गेली नाही. आता तब्बल ३३ वर्षांनंतर हा नेता वार्धक्याकडे वळला असताना त्याच्यावर गजाआड जाण्याची वेळ आली.