
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाले आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. हिंदूंच्या महत्त्वाच्या सणकाळात आंदोलन करण्याऐवजी चार दिवस थांबता आले असते, असे त्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, परंतु सामाजिक संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.