

Nagpur
esakal
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुलांना मोबाइलऐवजी आजी-आजोबांकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. उपराजधानीतील ‘सन्मार्ग माईंड वेलनेस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रा’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वीच्या काळी आजी-आजोबा नातवंडांना गोष्टी सांगून त्यांच्यावर नकळत संस्कार करत असत आणि कौटुंबिक मूल्यांची शिकवण देत असत.