Nagpur - शिकवणीला जात नसल्याच्या कारणावरून वडिलांनी अबोला धरला. ही बाब जिव्हारी लागल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास शांतीनगर येथील लालगंजच्या झाडे चौकात घडली.
वेद रितेश केळवदकर, असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेद दहाव्या वर्गात शिकायचा. तीन दिवसांपासून तो शिकवणी वर्गाला जात नव्हता. याबाबत वडिलांनी त्याची समजूत काढून शिकवणीला जाण्यास सांगितले; मात्र तो ऐकत नव्हता.
अखेर वडिलांनी त्याच्याशी अबोला धरला. वडील बोलत नसल्याचा परिणाम त्याच्या मनावर झाला. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वेदने घरीच सळाखीला टॉवेल बांधून गळफास घेतला. नातेवाइकांना तो गळफास लावलेला दिसला. फास काढून त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.