
नागपूर : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहावे. विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही क्षणी आवश्यकता भासेल तिथे उपस्थित राहण्याच्या दृष्टीने मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय पातळीवर आवश्यक सर्व उपाययोजना केल्या आहेत.