

Nagpur News
esakal
नागपूर: ‘कामगार आहे मी.. तळपती तलवार आहे...’ अशी कधीकाळी कामगारांची घोषणा ‘संघर्षा’ची चाहुल देत होती. परंतु सरकारने कामगार नियुक्तीची कंत्राटी व्यवस्था उभारून त्यांची आर्थिक पिळवणूक करून, त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कंत्राटदार एजन्सीच्या हाती दिला आहे.
यातून आउटसोर्सिंग शोषणाची नवी व्यवस्था व शोषकांची नवी टोळी उभारली गेली. यात एजन्सीचे पोषण होत असून कंत्राटी कामगार कुपोषित होत आहेत.