Nagpur Farmers : शेतकऱ्यांच्या माती परीक्षणासाठी ३५ हजार नमुने लक्ष्य; कृषी विभागाच्या निष्क्रियतेमुळे शेतीची माती होत असल्याची चिंता

Soil Testing Crisis : नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामात मृदा परीक्षणासाठी हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली, पण केवळ १७% नमुन्यांचीच तपासणी झाल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
Nagpur Farmers
Nagpur FarmersSakal
Updated on

चेतन बेले

नागपूर : शेतीचा वाढता खर्च कमी करण्यासाठी शेतकरी आधुनिक शेतीची कास धरू पाहत आहेत. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातून १३ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी नोंदणी केली. सव्वा पाच हजार शेतकऱ्यांनी चाचणीसाठी माती कृषी विभागाकडे पाठविली. मात्र, पाठविलेल्यांपैकी निम्म्या नमुन्याचीही चाचणी होऊ शकली नाही. कृषी विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळेच शेतीची माती होत असल्याचे वास्तव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com