

Nagpur News
esakal
नागपूर: खरीप हंगामाच्या तोंडावर खत विक्रेत्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात दररोज होणारी सुमारे सव्वा ते दीड कोटींची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. या आंदोलनामुळे दुकानात, व्यवसाय प्रतिष्ठानात रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या जवळपास ८ हजार कामगारांना फटका बसणार आहे. या संपात जिल्ह्यातील १ हजार २०० कृषी केंद्रांनी सहभाग घेतला आहे.