नागपूर: विभागात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा व खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विभागात कृषी विभागातर्फे धडक मोहीम राबविण्यात येत आहे. .या अंतर्गत विभागात १८३ खत विक्री केंद्रांना नोटीस बजावली असून ४३ केंद्रांचे परवाने निलंबित केले आहे. दोन विक्री केंद्रांवर गुन्हे दाखल केले आहेत.विभागातील सहा जिल्ह्यांसाठी या खरीप हंगामामध्ये १९.५३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे..प्रेम असावं तर असं! रितेश उपाशी असताना जेनिलिया ताट घेऊन मागे फिरायची, भाग्यश्रीनं सांगितला सेटवरील किस्सा.या हंगामासाठी शासनाकडून ७.१०० लाख मेट्रिक टन खत पुरवठा मंजूर झाला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या खतांची तसेच बियाण्यांची कमतरता भासणार नाही.खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांनी गरजेपुरतीच खते व बियाणे खरेदी करावी कुठल्याही परिस्थितीत अतिरिक्त साठा करू नये तसेच खतांचे नियोजन करत असताना केवळ युरिया व डीएपी खतावरच अवलंबून राहता इतर पर्यायी व संयुक्त खताचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..खत विक्री केंद्रांनी खत विक्री केवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावी. विक्री करताना मशीनद्वारे विक्री करावी तसेच शिल्लक खत प्रत्यक्ष साठा त्याची नोंदवही ठेवावी, असे आवाहन ही विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी केले आहे..आज 21 एप्रिलला बनतोय गजकेसरी हा राजयोग ! पाच राशींना मिळणार प्रोमोशन, पैसा आणि आनंदाचा दिवस."विभागात खतांचा तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार साठेबाजी थांबवण्यासाठी कृषी विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. अनावश्यक खतांचा साठा तसेच साठेबाजी करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे."-उमेश घाडगे, कृषी सहसंचालक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.