

Nagpur
esakal
नागपूर: विनयभंगाची कथीत घटना घडल्यानंतर शिक्षिकेकडून सहा दिवसांनी तक्रार दाखल करण्यात आली. विलंबासाठी 'मांजरीने चावा घेतल्यामुळे विश्रांती घेत होती' हे दिलेले कारण ग्राह्य वाटत नाही, कारण त्या कालावधीत ती नियमितपणे शाळेत जात होती, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैज्ञानिक असलेल्या शाळेच्या अध्यक्षाविरुद्धचा विनयभंग व लैंगिक छळाचा गुन्हा रद्द केला.