Nagpur Highway: महामार्ग की मृत्यूचा सापळा? ३७५ अपघातात वर्षभरात ११४ जणांचा मृत्यू

शहरालगत असलेल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात नजिकच्या सात राष्ट्रीय महामार्गासह बारा राज्य महामार्गांवर झालेल्या ३७५ अपघातांमध्ये ११४ जणांना जीव गमवावा लागला.
Nagpur Highway: महामार्ग की मृत्यूचा सापळा? ३७५ अपघातात वर्षभरात ११४ जणांचा मृत्यू
esakal

Nagpur State Highway Accident Cases: शहरालगत असलेल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात नजिकच्या सात राष्ट्रीय महामार्गासह बारा राज्य महामार्गांवर झालेल्या ३७५ अपघातांमध्ये ११४ जणांना जीव गमवावा लागला. अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने नागपूर सभोवतालचे हे महामार्ग आहेत की मृत्यूचा सापळा? असाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

मध्यप्रदेश, तेलंगना आणि आंध्रप्रदेश ही राज्ये अशी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांच्या सीमेलगत असल्याने या राज्यात जाण्यासाठी नागपूर शहर सात राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेले आहे. यामध्ये नागपूर-मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, नागपूर आरमोरी ३५३-डी, नागपूर-अमरावती (एनएच ६), नागपूर-भंडारा- आरमोरी ३५३ - ए, नागपूर-जबलपूर (एनएच-४४) नागपूर-हैद्राबाद व्हाया चंद्रपूर १६१ आणि नागपूर- तुळजापूर या महामार्गांचा समावेश आहे. याशिवाय १२ राज्य महामार्गांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गांचे स्वरूप पालटले आहे. विस्तीर्ण रस्ते आणि अनेक सोयी-सुविधांची उपलब्धता असल्याची वारंवार चर्चा होताना दिसून येते. मात्र, महामार्गांवरील अपघात रोखण्यात प्रशासनालाही अपयश आल्याचे दिसून येते. त्यामुळेच शहरालगत असलेल्या सात राष्ट्रीय महामार्गावर ३०६ अपघातात ८९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ७३ पुरुषांचा समावेश असून १९४ जणांना गंभीर दुखापती झाल्यात. राज्य महामार्गांची आकडेवारी बघितल्यास या महामार्गावर झालेल्या ६९ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

तत्काळ मदतीचा अभाव

महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये बहुतांश जखमींना लवकर वैद्यकीय मदत मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा अपघाताची माहिती मिळाल्यावर रस्त्यावरील वाहनांकडून मदत मिळत नसल्याचे वास्तव आहे. पोलिस आणि वैद्यकीय सुविधा मिळेपर्यंत अनेकांचा मृत्यू होताना दिसतो. (Latest Marathi News)

Nagpur Highway: महामार्ग की मृत्यूचा सापळा? ३७५ अपघातात वर्षभरात ११४ जणांचा मृत्यू
Maharashtra Politics : पुणे-मुंबईचा राज्य सरकार एवढा तिरस्कार करत असेल तर... आदित्य ठाकरे यांनी वाचला रखडलेल्या कामाचा पाढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com