

Nagpur News
esakal
नागपूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) मजुरीत दर पाच वर्षांची वार्षिक होणारी वाढ यंदा रखडली आहे. याचा थेट परिणाम कामांवर दिसत आहे. जिल्ह्यात ३ लाखांच्या वर जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या आहे. मात्र, प्रत्यक्ष कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या केवळ ३ हजार १३६ एवढी अत्यल्प राहिल्याने योजना कागदावरच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.