

Nagpur News
esakal
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) सुरू असलेल्या खोदकामादरम्यान महावितरणच्या भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाले. यामुळे २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा काही काळासाठी विस्कळीत झाला. वाढत्या तापमानामुळे नागरिक आधीच हैराण असताना अचानक वीज खंडित झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.