

Nagpur News
esakal
नागपूर: तहाणलेल्यांना पाणी पाजणे हा पूर्वी धर्म समजला जात होता. उन्हाळ्याच्या कडक उन्हात वाटसरूंना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय ‘पाणपोई’द्वारे केली जात होती. मात्र, आता त्याचाही व्यवसाय झाला आहे. लोकांना धर्माचा विसर पडल्याची खंत तहानेने व्याकूळ झालेले वाटसरू ६५ वर्षीय मोतीराम बडगे यांनी व्यक्त केली.