

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे तणाव वाढला आहे. परिणामी, काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, नागपूर जिल्हा प्रशासनाने शाळांना स्वातंत्र्य दिले असून, त्यांनी परिस्थितीनुसार स्वतःचा निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.