

Nagpur News
esakal
नागपूर: नागपूर ग्रामीण पोलिसांनी रस्ते सुरक्षेसाठी राबविलेल्या उपाययोजनांना यश मिळाले असून, जानेवारी ते मार्च २०२६ या पहिल्या तिमाहीत अपघात आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत प्राणांतिक अपघात २४ टक्क्यांनी, मृत्यू २७ टक्क्यांनी, तर जखमींची संख्या १० टक्क्यांनी घटली आहे. राज्यात अपघात कमी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नागपूर ग्रामीणने तिसरे स्थान पटकावले आहे.