

Nagpur News
sakal
नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहतूक नियमांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. हेल्मेटचा वापर टाळणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे आणि वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, यासह रस्त्याच्या मध्यभागातून वाहने क्रॉस करणे, यामुळे अपघातांची शक्यता वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.