

Nagpur News
esakal
नागपूर: यंदा मार्च मध्येच तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसपलिकडचा टप्पा गाठला आहे. परिणामी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी कठीण झाले आहे. विशेषतः सिग्नलवर थांबणाऱ्या दुचाकीस्वार, वाटसरू आणि रिक्षाचालकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मनपाकडून दरवर्षी मे-जून महिन्यात सिग्नलवर लावण्यात येणाऱ्या ‘ग्रीन नेट’ची आवश्यकता यंदा आत्ताच भासत असून, त्या लावून नागपूरकरांना दिलासा देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.