
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. येत्या १० मार्चला या सर्व निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास १३ महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर राज्यात सत्तापालट होणार असल्याचा दावा केला होता. (Nana Patole News Update)
यानंतर सत्तेत असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही १० मार्चचा उल्लेख केला आहे. नुकतेच नाना पटोले दिल्लीवारीवरून माघारी आले आहेत. हायकमांडसोबत त्यांची खलबलं झाल्याची माहिती मिळत आहे. याला खुद्द त्यांनीच भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात दुजोरा दिलाय. (Nana Patole)
सध्याच्या सरकारमध्ये जे काही सुरू आहे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची वेळ आली असून 10 मार्चनंतर हे काम करणार असल्याचे वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यानिमित्ताने १० मार्चची चर्चा सुरू झाली होती. त्यात आता पटोलेंनीही उडी घेतलीय.
भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे 10 मार्चनंतर सरकारमध्ये बदल पाहायला मिळतील. त्यामुळे नाना पटोले 10 मार्चनंतर नेमकी कोणती पावले उचलणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.