Cow-based Agriculture : गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेती शक्य नाही – भैय्याजी जोशी
Natural Farming in Nagpur : देशी गायींच्या संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही, असे मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. शितलवाडीत गो-विज्ञान अनुसंधान केंद्राच्या नूतन गोशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शितलवाडी : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे अखिल भारतीय ज्येष्ठ सदस्य भैयाजी जोशी यांनी केले.