नागपूर : ज्या आमदार, खासदारांना ईव्हीएमवर शंका आहे, त्यांनी आधी राजीनामे आणि बॅलेटवर निवडून येऊन दाखवावे असे आव्हान आज मत्स्य उत्पादन मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केले. .लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात मोठा विजय मिळाला होता. त्यामुळे विधानसभेत मोठे यश मिळेल आणि महाविकास आघाडी सत्तेवर येईल अशी आशा काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होती. मात्र महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे फक्त १६ आमदार निवडून आले. त्यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. निवडणुकीच्या निकालावर अद्यापही त्यांचा विश्वास बसत नाही. .निकालाच्या विरोधात पराभूत झालेल्या सुमारे शंभर उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा लोकसभेत वाढीव मतदार आले कुठून याची माहिती देण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर ही मते शोधून काढण्यासाठी काँग्रेसने ईगल समिती स्थापन केली आहे..यावर बोलताना राणे म्हणाले, आयोगाच्या कारभारावर व ईव्हीएमवर एवढीच शंका असेल तर काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांनी आधी राजीनामे द्यावे आणि बॅलेटवर निवडून येऊन दाखवावे. नंतर त्यांना त्यांची जागा कळेल ते आजी राहातात की माजी. महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वाच्या नावाने निवडून आले यांचे दुःख काँग्रेसला आहे..आमच्या मालेगावमध्ये एकाच मतदारसंघात एक गठ्ठा मतदान काँग्रेसला पडले. त्यांचा खासदार निवडून आला. आम्ही त्यावर आक्षेप घेतला नाही आणि शेंबड्यांसारखे रडत बसलो नाही. आम्ही कामाला लागलो. मेहनत घेतल्याने हरियाना व महाराष्ट्रमध्ये सत्ता आणून दाखवली. आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला. स्वतः ईव्हीएमवर निवडून यायचे आणि मग रडत बसणे काँग्रेसने बंद करावे. त्यापेक्षा लोकांची कामे करा, असा सल्लाही राणे यांनी काँग्रेसला दिला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.