नागपूर - ‘राज्य सरकारने दोन सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शासन निर्णयामध्ये आधी असलेला ‘पात्र’ शब्द वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला..तो ‘ओबीसीं’च्या हक्कांवर गदा आणणारा आहे. या विरोधात विदर्भातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरत १० ऑक्टोबरला नागपुरात महामोर्चा काढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली..ते म्हणाले. ‘विदर्भातील ओबीसी संघटनांची बैठक शनिवारी नागपुरात पार पडली. सरकारच्या शासन निर्णयानंतर मराठवाड्यातील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली. या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. याविरोधात रस्त्यावरील लढाई लढण्याची तयारी संघटनांनी बैठकीत दर्शवली. त्यानंतर दहा ऑक्टोबरच्या महामोर्चाची घोषणा करण्यात आली..जे कोणी या शासन निर्णयाविरोधात आहे, त्या संघटना आणि नेत्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे. जे कोणी पक्षाची पादत्राणे बाहेर ठेवून या लढ्यात सहभागी होतील. त्या सगळ्यांचे या मोर्चात स्वागत असेल, असेही वडेट्टीवार म्हणाले..याचिका उद्या होणार दाखलसरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात वकील संघटन देखील एकवटल्या असून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सोमवारी (ता.१५) याचिका दाखल होणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात एक तरुणाने आत्महत्या केली. तरुणांनी टोकाचे पाऊल न उचलता समाजाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.