
गडचिरोली : नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेऊन आला आहे. विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.१) येथे व्यक्त केला.