
जालना : येत्या शनिवारी (ता. सात) बकरी ईद आहे. त्यामुळे तीन ते आठ जून या काळात पशुधन विक्रीचा बाजार बंद ठेवण्याचे निर्देश राज्य गोसेवा आयोगाने दिले आहेत. त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मंगळवारचा (ता. तीन) पशुधन विक्रीचा बाजार बंद होता. मात्र, तरी देखील पशुपालकांनी बकऱ्या, बोकडे, मेंढ्या विक्रीसाठी आणल्या. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. तीन) बकऱ्या, बोकडांचा बाजार उठवला.