Samruddhi Mahamarg Accidents
esakal
इगतपुरी शहर (नाशिक) : शहराच्या वळण रस्त्यालगत पिंप्रीसदो परिसरात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) गेल्या आठ महिन्यांत २३ अपघात झाले असून, त्यात २४ जणांचा मृत्यू झाला; तर ३० ते ३५ जण गंभीर जखमी अथवा दिव्यांग झाले आहेत. अपूर्ण सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणेचा अभाव ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.