Nagpur News : खळबळजनक घटना! महागाव तालुक्यात वीज पडून ४० जनावरे ठार; बॅक वॉटरमध्येच पडली वीज, दहा पशू बेपत्ता

मृत जनावरांच्या पोस्टमार्टेमचा अहवाल आला असून वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असून अजून दहा जनावरे बेपत्ता असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. मृत पशूंना पाण्याबाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. धारकान्हा हे गाव दुर्गम असून डोंगरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येते.
Lightning Strike
Lightning StrikeSakal
Updated on

महागाव (जि. यवतमाळ) : धारकान्हा या दुर्गम गावात मंगळवारी (ता. १०) मोठे आक्रीत घडले. गावालगत वेणी अधर पूस प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये वीज पडून ४० जनावरे मृत्युमुखी पडल्याची खळबळजनक घटना घडली. महसूल, पोलिस प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी (ता. ११) दुपारी बारापर्यंत ३१ गायी, सहा वासरे आणि तीन वळूंचे मृतदेह धरणाच्या काठावर आढळून आले. अजून दहा पशू बेपत्ता आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com