नागपूर - ‘काँग्रेसच्या राजकीय नेत्यांचा भाजपमध्ये सुरु असलेले सर्वच प्रवेश इच्छेने होत नसून त्यांना भीती दाखवली जात आहे. काहींना लालूच दाखविली जात आहे. भाजप ही नेता खाणारी चेटकीण असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला..काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे काँग्रेस युक्त भाजप अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्याचा टोलाही त्यांनी मारला.सर्वोदयी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी सपकाळ आज शहरात आले होते..ते म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. हे बघून काही स्वार्थी लोक सत्तेसाठी त्यांच्याकडे जात आहे. त्याहीपेक्षा सत्ताधारी तपास यंत्रणांची भीती दाखवून त्यांना आपल्याकडे खेचून घेत आहेत..मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे. फक्त बोलायचा भात बोलाची कडी असेच भाजप आणि मोदी सरकारचे धोरण आहे. कुठल्याही गोष्टीचा उत्सव ते करतात.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.